Tuesday, August 1, 2017

२४ नोव्हेंबर निमित्त...(Flashback) (Article written on occasion of Friend's Birthday... )

२००४-०५ ची गोष्ट. एम.जे. कॉलेज च्या मुलांच्या वसतिगृहात रूम नंबर २ मी राहत होतो. रूम नंबर १ आणि २ म्हणजे कमवा आणि शिका (काही तथाकथित लोकांच्या भाषेत “कमवा आणि खा”)च्या विद्यार्थ्यांसाठी राखीव. एका रुममध्ये १०-१२ विद्यार्थी राहायचे. कॉट फक्त ३. सगळे एकत्र रुममध्ये असले म्हणजे पाय ठेवायला हि जागा नसायची. रुमच्या खिडक्या नेहमी उघड्या असायच्या. कारण हि तसचं. बाहेर मेन रोड आणि त्यापलीकडे अपार्टमेंट. त्यामुळे रोडवर हिरवळ नसली तरी अपार्टमेंट मध्ये असायची. काही खिडकीजवळ खुर्ची टाकून बाहेरचं सौंदर्य पाहत राहायचे. एवढे विद्यार्थी असल्याने स्वच्छता नावाचा प्रकार नव्हता. कोण करणार हा पण एक गहन प्रश्न होता. कधी कधी लिस्ट तयार करून प्रत्येकाचा स्वच्छता दिवस ठरवावा. ते काही दिवस चालायचं आणि पुन्हा जैसे थे. रात्री कितीही अभ्यास करायचा प्रयन्त केला तरी शक्य नव्हतंच. येणा-जाणार्या गाड्यांचे आवाज आणि रूम मधला गोंधळ ते कायमचेच. मी मात्र त्या गोंगाटात स्वतःच भविष्य शोधण्याचं प्रयत्न करत होतो. कित्येकांचं ते हिरवळ पाहण्यात पदवी संपली. मी सहसा त्या फंदात पडलो नाही. त्या हिरवळीपायी स्वतःच आयुष्य उजाड रान होऊन जायचं म्हणून लक्ष दिलं नाही. याचा अर्थ असाही नाही कि मला ती हिरवळ अनुभवावी वाटली नाही.
अभ्यासाचं वातावरण तसं कधी निर्माण झालं नाही. वाचन मात्र चालायचं. आमच्यातला एक बहाद्दर कायम पुस्तकं वाचत राहायचा. नन्तर कळाल कि तो वेगळंच साहित्य वाचत असायचा. आमच्यातल्या बऱ्याच जणांकडे ते साहित्य फिरत असायचं. वाचनाने व्यक्ती प्रगल्भ होतात असं ऐकलं होतं. ते किती प्रगल्भ झालेत हे त्यांनाच ठाऊक.
दुसर्या वर्षाला होतो तेव्हा. राष्ट्रीय सेवा योजनेत रविवारी श्रमदानासाठी जायचो. त्यावेळी प्रा.काटीकर सर कार्यक्रम अधिकारी होते. किंबहुना त्यांच्यामुळेच त्याचा एक भाग झालो. सर म्हणजे अस्सल व्यक्तिमत्त्व. मराठी साहित्यात त्यांचा हातखंडा. प्रत्येक गोष्ट सहज करून सांगण्यात ते प्रवीण. विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागणारे, वाचनाची आवड असणारे असं काही सांगता येईल त्यांच्याबद्दल.
एकदा मी रूमला एकटाच होतो. बाहेरून कुणीतरी दरवाजा ठोकला. दरवाजा उघडला तर समोर एक रूम नंबर १२ मधला विद्यार्थी बाहेर उभा. काय रे काय म्हणतो? तो म्हटला, चल चहा प्याला जाऊ. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही चहा प्यायला बाहेर पडलो. फार ओळख नव्हती. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि मग रोज सोबत चहाला जाने सुरु झालं. मी आर्ट्स ला तर तो बी.एस.सी. ला. भिन्न शाखा असल्या तरी विचार आमचे थोडेबहुत मिळतेजुळते. तसं स्वभाव मात्र एकदम टोकाचे. तो एकदम सद्गृहस्थ आणि मला मात्र तो शब्दच लागू पडत नाही. पुढे एन.एस.एस. च्या शिबिरात (कानसवाडे) आमची मैत्री वृद्धिंगत झाली ती कायमचीच. माझ्या आयुष्यातला हा दुसरा मित्र. पहिला मुकेश जाधव (स्वतंत्र लिखाणाचा विषय). आणि मी, मुकेश आणि तो हे समीकरण (A=B=C so C=A) घट्ट होत गेलं. आम्ही म्हणजे तीन टोकाचे तीन बिंदू...तरी टोकाचे मतभेद बाजूला ठेऊन पुढे जाणारे. पदवी चं तिसरं वर्ष त्यांच्याच रुममध्ये घालवलं. जळगाव ला भटकंती हि खूप केली. ओमकारेश्वर मंदिराकडील फेरफटके, दोन डब्ब्यात तीन, मेस बंद असली कि चहा बिस्कीट, चित्रपटगृहाला दिलेल्या भेटी, आणि बरंच काही. वादविवाद नाही झालेत असंही नाही. जीवनाचा एक भाग म्हणून ते कधीच मागे पडलेत. यश- अपयश या काळात सोबत राहिली.
पुढे मी पुण्यात गेलो ते त्याच्यामुळेच. मला पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा द्यायची नव्हती. जळगाव मध्ये मन लागलं होतं. पण तो म्हटला “परीक्षा तर दे, पास होऊन दाखव आणि जाऊ नको.” ते मला पटलं. त्यावेळी सहजासहजी कुणी ती प्रवेश परीक्षा पास होत नव्हतं. मी ती पास झालो पण पुण्याला जाने टाळू शकलो नाही. पुणे विद्यापीठात गेलो तरी आमचा संपर्क कायम होता. नियमित पत्र व्यवहार आणि नंतर फोन. अधून मधून तो विद्यापीठात भेटायला येत असायचा. मी घरी येणार असलो कि अगोदर जळगाव ला उतरायचो. आणि जाताना हि तसचं. एकदा त्याने मला सकाळी फोन केला आणि सांगितलं कि माझा चुलतभाऊ काही निमित्ताने पुण्यात आलाय, आता तो विद्यापीठाच्या गेटवर आहे, त्याला पिक अप कर. मी गेट वर गेलो तर तोच समोर. चकित करायची त्याला भारी हौस. पुणे जिल्ह्यातील भरपूर ठिकाणे आम्ही सोबत फिरलो.
आम्ही कुठली गोष्ट सहसा एकमेकांपासून लपवून ठेवत नाहीत (अपवाद असू शकतात काही गोष्टी!). मी जिथं जिथं गेलो तिथं तो भेट देत राहिला. अजूनही आमच्या भेटीगाठी सुरु राहतात. फोन वर चा संपर्क तसा कमी झालाय. दोनाचे चार, चारचे सहा झालेत, जबादार्या वाढल्यात त्यामुळे ते साहजिक. आज हि कुठलीही अडचण असली आणि मला शक्य झालं नाही तर मी शेवटचा फोन त्याला करतो.
जळगाव मधून फोन असला म्हणजे त्याच्याच असणार हि आमची खात्री. मग मोबाईल वरून असो कि landline.
आमच्यात औपचारिकता करायची पद्धत चं नाही. वाढदिवस, सणवार, नवीन वर्ष किंवा अजूनकाही असो आम्ही कधी एकमेकांना शुभेच्छा देत नाही. त्यावर विश्वास नाही आमचा.
पण हे लिखाण अपवाद...
आज २४ नोव्हेंबर म्हणजे त्या मित्राचा वाढदिवस. पूर्वी शुभेच्छा दिलेल्या आठवत नाही. त्यानिमित्ताने हे लिखाण...(तसंही कित्येक दिवस झाले काही लिहिलं नव्हतं. )

प्रा. मनोज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून हे लिखाण... जीवेत शरद: शतम्‌

आयुष्याला कलाटणी देणारे काही प्रसंग

प्रसंग एक:
पंधरा-सोळा वर्षे वय...फार काही कळत नव्हतं. त्यातच आर्थिक परिस्थिती बिकट होती. थोडक्यात सांगायचे झाल्यास खायचे हि वांधे होते. त्यामुळे शनिवार-रविवार शेतात कामाला जाने नित्याचेच. असंच एकदा एका शेतकऱ्याच्या शेतात कामाला गेलो होतो. ग्रामीण भागात पाथ हा एक शब्द आहे. म्हणजे अनेक मजुरांचा समूह. त्याचा एक नेता (आताच्या भाषेत). त्याने सर्वांसाठी काम शोधणे. तो काम करत नाही. शेतकऱ्याला जेवढे मजूर लागतात तेवढे पुरवणे. म्हणजे मजुराचा शेतकर्याशी संबंध येत नाही. मजुरी वगैरे सगळं काही हा शेतकर्याशी बोलणार. असंच एकदा मी पाथीमध्ये कामाला गेलो होतो. दोन-अडीच तास काम केल्यानंतर सगळे एकत्र जेवण करत होते. तेवढ्यात शेतीमालक तिथे आला. किती मजूर आहेत म्हणून त्याने विचारणा केली. २१ अस उत्तर त्याला मिळालं. मला फक्त वीस च पाहिजे असं त्याने सांगितलं आणि माझ्याकडे पाहून याला कशाला कामाला आणलं अशी विचारणा केली. याला वापस पाठवून दे असं म्हणून तो निघून गेला. जेवण सुरु होतं. हे संभाषण ऐकून जेवण अर्धवट सोडलं आणि सरळ घरचा रस्ता पकडला. काही मजुरांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला. एक-एक रुपया जमा करून तुला २० रुपये देऊ म्हटले. त्यावेळेस मजुरी तेवढी होती. पण मला ते पटलं नाही. शेत फार दूर होतं. नदी-नाले ओलांडत माझा परतीचा प्रवास सुरु होता. दोन-अडीच तास काम केल्यानंतर असं झाल्याने फार वाईट वाटलं. बर्याच दूर आल्यानंतर मी एका झाडाखाली बसलो निवांत बसलो आणि नकळत डोळ्यातून अश्रू सुरु झाले. आसपास फक्त पक्ष्यांची किलबिलाट, आणि वेगानं सुटणारा व वारा. आकाश निरभ्र होतं. भविष्यात काय लिहिलंय आहे याची ती चुणूक होती. असे कित्येक प्रसंग येणार, पुढे काय होणार याचा विचार करत करत तिथेच संध्याकाळ झाली आणि मी घरी येण्यासाठी निघालो.
प्रसंग दोन:
अकरावी ला होतो तेव्हाची हि गोष्ट. मी नातेवाईकांकडे शिकण्यासाठी होतो. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. पण नन्तर त्यांचे आणि माझी वडिलांचे वाद झाले. आणि त्याची झळ माझ्यापर्यंत येऊन पोचली. अभ्यास सुरु असताना लाईट बंद करणे, शिवीगाळ करणे, कॉलेज जा जाण्यासाठी सायकल न देणे असे नानातर्हेचे प्रयोग सुरु होते. माझ्यासमोर पर्याय नव्हता. मी हे सगळं सहन करत होतो. कित्येक वेळा गच्चीवर जाऊन रडलोय. एवढ्या कमी वयात हे सर्व सहन नाहीच करता येत. पण समोर भविष्य होत. निमुटपणे सगळं सहन करणे एवढ्याच पर्याय होता. एकदा असंच सकाळी पोहे खात होतो. त्यात एक नातेवाईक सदस्य तिथे आला आणि माझ्या हातातली पोह्याची प्लेट हिसकावून बाहेर फेकली. मी काहीच नाही बोललो. पण मनात मात्र भावनांच द्वंद सुरु झालं होतं.  आजही जेव्हा पोहे समोर आले कि त्या प्रसंगाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
प्रसंग तीन:
जळगाव ला पदवीच शिक्षण सुरु होतं. इथेही नातेवाईक पण जरा जवळचे. त्यामुळे सगळं काही ठीक असेल अशी धारणा होती. पण तसं काहीच नव्हतं. रोज ते मला काम कर म्हणायचे. शिकून काय उपयोग होणार आहे. त्यापेक्षा कंपनीत जा, अठराशे रुपये मिळतात. पुढे अजून जास्त मिळतील मला शिकायचं होतं. इथेही फसलो होतो. कधी कधी तर याला चहा द्यायचा नाही इथपर्यंत सगळं. मी जेमतेम सहा-आठ महिने तिथे कसेबसे काढले आणि नन्तर होस्टेल ला गेलो. कमवा आणि शिका योजनेत काम करायचं. महिन्याला जेवणापुरते पैसे मिळायचे आणि राहणे फुकट. वसतिगृहात गेल्यानंतर त्या नातेवाईकांकडे मी क़्वचितच गेलो. मला आठवत नाही. मी कित्त्येक वेळा जळगाव जातो पण तिथे पाय टाकत नाही.
वाईट काळात ज्यांनी साथ दिली नाही त्यांची साथ नकोय.  चांगल्या काळात तर कुणीपण साथ देते.
दोन वेळेस च्या जेवणासाठीचा संघर्ष माणसाला या समाजात काय नाही सहन करायला भाग पाडत?
कधी निमुटपणे, कधी निर्लज्जपणे तर कधी काहीच कळल नाही असं.
मी का शिकलो? तर मला त्याची आवड होती किंवा तेच माझं ध्येय होतं असं काही नाही.  पण आसपास च्या लोकांनी मला प्रेरित केलं. त्यांनी दिलेला प्रत्येक अनुभव कायम झोंबत राहिला. त्यामुळे मी चालत राहिलो. त्या प्रसंगांनी मला जगण्याची नवी उमेद दिली, बदल घडवण्याची स्फूर्ती दिली.
मी कुणालाही दोष देत नाही. ज्याने त्याने त्याचं त्याचं कर्तव्य केलं. कुणी चांगले तर कुणी वाईट अनुभव दिलेत. पण त्या अनुभवांनी मी समृद्ध झालोय, शिकलोय, वाढलोय. त्यामुळेच रंगीबेरंगी जीवनाचा आस्वाद घेऊ शकलोय. दोन वेळेस च्या जेवणाचा प्रश्न मिटवण्यात यांनी खूप हातभार लावलाय. वेगवेगळ्या प्रकारची लोकं नसती भेटली तर जीवनाचा अर्थ कळला नसता आणि जीवन अनुभवता हि आलं नसतं.


Life Is...

Life is never what I see. It is what I never see. It is always beyond my understanding. Life provided me an an opportunity to understand the people when I was in crisis. Nobody did help me when I really wanted. Close friends had also stopped contacting. I did not feel bad. But I came across the harsh reality of life that WE ARE ALWAYS ALONE AND WHAT WE THINK IS JUST AN ILLUSION.
Professionalism...a word I heard very late in life when I started teaching in Engineering. I never wanted to be a lecturer in Engineering nor it was my passion, but I am there now. It is like a boon in disguise as it not only taught me a lot but also transformed me in many aspects. This is what life is.
Passion...a buzz word...passion is never for the poor people...it is only for the rich people who can pursue what they want. For poor it is like do or die. Further it is a struggle for getting meal at two times. What we expect never happens and what happens we never expect.
Sometimes in life, the situations come where we just have to watch what is going on in front of us. We see the injustice done but we cannot do anything. We are trapped in a situation where there is no exit. I never put the demands. I always feel if I work with dedication, my skills will be enhanced.
I want to be more productive than I am now. The incessant efforts will never go in vain.
I was born a beggar and I don't mind to go back at the same position again. Life has taught me to rise with the same intensity even if I fall. It would be a new beginning. I like to enjoy that process.
"People are jealous when we really work. They try to harass us mentally. People in power do this. But we should not lose our stability of mind. The more they harass us, the stronger we become."

Lastly, any moment can be the last moment in Private Sector....an important lesson that I learnt over the years.

FIFTEEN MINUTES ON THE TRAIN

Few days back I was travelling from Nagpur to Delhi by Rajdhani Express. The train had started late by an hour. I had to wait at Nagpur Railway station for more than three hours. I entered the train and sat on the upper seat. It was a 3AC compartment. I wanted lower seat but it was not available when I booked the ticket 15 days back. I never liked waiting for something but sometimes in life you don't have an option. All was well in the compartment. There was no noise. Everything was being served time to time. I was able to see the difference in Railway services in the course of few years. 
After the dinner I was surfing Internet when I saw that two IRCTC PERSONNELS who had served us were asking for money from the passengers. I knew they would come to me. They were arguing if the passenger paid less than hundred rupees. No passenger could avoid it. When they came to me, and asked for money, I asked how much. One of them said, sir give 500-600. I offered him 50 rupees even if he was asking 100 rupees. Both of them moved to the another passenger who was in deep sleep and and made him wake up and asked for money. That passenger paid without any reservation. In the meantime I was shooting that incident unknown to them. I didn't know why I was doing that but I did it. 
I tried to sleep when it was over but couldn't. I didn't like the way those people were asking for money from the passengers. I logged in on twitter and posted the complaint at the official twitter handle of Indian Railway. They replied me instantly which was a pleasant surprise. I provided them all the details with the photo also. In the next five minutes some railway officers came and enquired. I told them everything. One of the officers asked that staff to return my money but I said, Return the money of all the passengers first and give me at the end. They did it. All these things happened in span of 15 minutes. The incident offered me a sense of satisfaction. I did not know when I slept and woke up when Delhi was nearby. Other IRCTC staff smiled at me when I was getting down.

No government initiative can help us unless we become conscious and follow it. We are the people who can fight if the right things don't happen. (See the screen shots of the conversation)
No automatic alt text available.




No automatic alt text available.

Image may contain: one or more people

No automatic alt text available.

No automatic alt text available.