Saturday, August 17, 2019

श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय


विदर्भाची पंढरी संतनगरी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेलं शेगाव. ऐंशीचं दशक. २०-२५ हजार असलेली लोकसंख्या.  शैक्षणिक मागासलेपण असंच काहीसं चित्र. मोठ-मोठ्या शहरांमध्ये जाऊन कित्येकांना तांत्रिक शिक्षण परवडणारे नव्हते.  हे चित्र बदलायचं म्हणजे नेतृत्वाची, दूरदृष्टीची गरज.  त्यावेळेस तांत्रिक शिक्षणाचा मागमूस ही नव्हता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते आवाक्यापलीकडचे. अश्या परिस्थितीत १९८३ मध्ये कर्मयोगी श्री शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्री गजानन शिक्षण संस्थेद्वारे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय ची स्थापना केली आणि बदलाची प्रक्रिया सुरु झाली.  सुरुवातीला रेल्वे स्टेशन जवळ दोन भाड्याच्या खोलीमध्ये हा प्रवास सुरु झाला. या महाविद्यालयाच्या रूपानं त्यांनीएक छोटंसं रोपटं लावलं. त्याचं सातत्याने संवर्धन केलं. आणि पाहता पाहता या रोपट्याचा वटवृक्ष झाला. तब्बल ८२ एकर परिसरावर हे महाविद्यालय आज उभं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचं दालन या निमित्ताने उपलब्धझालं.  शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो. हे महाविद्यालय म्हणजे सेवेचं, ज्ञानाचं प्रतिक.  महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातूनच नव्हे तर इतर राज्यातून हिविद्यार्थी इथे अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी येतात.  महाविद्यालयात यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, परमाणु आणि दूरसंचार अभियांत्रिकी च्या एकूण ३६० जागा आहेत. तसेचअभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचा दोन वर्षाचा पदव्युत्तर कोर्स सुद्धा उपलब्ध आहे.
महाविद्यालय अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असून सर्व अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहेत. महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमांना चार वेळा एन. बि. ए. ने नामांकन दिले. आता पाचव्यांदा नामांकनासाठी महाविद्यालयाने प्रस्ताव पाठवला आहे. त्यात प्रिक्वालिफायर साठी महाविद्यालय पात्र आहे.  नॅक बेंगलोर नामांकन सर्व अभ्यासक्रमांना मिळालंय. अभ्यासक्रमांची गुणवत्ता वाढवणे आणि टिकविणे यासाठी महाविद्यालयाकडून सातत्याने प्रयत्न केले  जातात. विद्यापिठ परीक्षांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षी गुणवत्ता येतात. तसेच स्मार्ट इंडिया हकथॉन, कडेन्स इंडिया कोंटेस्ट, विद्यापिठ प्रकल्प स्पर्धा या सारख्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यशस्वी होऊन महाविद्यालयाचा लौकिक वाढवत आहेत.
विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत प्लेसमेंट साठी आवश्यक गुण जसे कि  मल्टी टास्किंग,संभाषण कला, ऍप्टिट्यूड, सकारात्मक वृत्ती,सॉफ्ट स्किल्स, नेतृत्व गुण, तांत्रिक कौशल्य, सांघिक कौशल्य, आत्मविश्वास ई. विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी तज्ज्ञांचे मार्दर्शनपर कार्यक्रम, कार्यशाळा, प्रशिक्षण, सेमिनार सातत्याने आयोजित केल्या जातात. त्यात तज्ञ प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकरतात. परकीय भाषा वर्ग, स्पोकन इंग्लिश, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, समुपदेशन ई. सातत्याने सुरू असते.
तसेच उद्योग जगतात सुरु असलेले बदल अंगीकारण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक माहिती होण्यासाठी तसेच उद्योग जगताची खोलवर माहिती व्हावी यासाठी   विद्यार्थ्यांना इंटर्नशिप साठी विविध कंपन्यांमध्ये पाठवले जाते. त्यामुळे आपणकाय शिकत आहोत, त्याचा उद्योग जगतात काय उपयोग आहे तसेच अजून काय करायला हवं याची जाणीव विद्यार्थ्यांना होते. त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने कंपन्यांमध्ये उच्च पदावर नियुक्त होत आहेत.
प्लेसमेंट साठी महाविद्यालयात अनेक कंपन्या येतात आणि विद्यार्थ्यांची निवड करतात. महाविद्यालयाचे प्लेसमेंट उत्कृष्ट असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. उद्योजक कसं व्हावं यावरही  मार्गदर्शन केलं जाते. त्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष आहे.
संशोधांनाला वाव देण्यासाठी अद्ययावत संशोधन केंद्र स्वतंत्र इमारतीत असून विद्यार्थ्यांसाठी नेहमी पलब्ध आहे. वेळोवेळी मार्गदर्शन तसेच स्टार्ट अपसाठी विद्यार्थ्यांना सहाय्य या केंद्रामार्फत केले जाते.

अभियांत्रिकी शिक्षणात क्षेत्रात श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेतुन उत्तीर्ण झालेले हजारो विद्यार्थी जगातील मोठ-मोठ्या नामांकित कंपनीत नोकरी करीत आहेत. औद्योगिक क्षेत्राचीगरज लक्षात घेऊन अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून प्रशिक्षण सातत्याने आयोजित केले जाते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून अभ्यासपुर्ण विद्यार्थी घडविण्याचेकाम तज्ञ प्राध्यापक करीत आहे. महाविद्यालयात कुशल, अनुभवी व उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग तसेच पी.एच.डी धारक प्राध्यापक असून त्यांच्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
महाविद्यालयाचे कित्येक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये देश-परदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला जातो. त्यात देश-परदेशात असलेले माजी विद्यार्थी सहभागी होतात आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनामार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये महाविद्यालय आणि पालक  यांची महत्त्वाची भूमिका असते.  त्यासाठी दरवर्षी पालक मेळावा आयोजित केला जातो. विद्यार्थ्यांची प्रगती पालकांना   सांगितली जाते. आदरयुक्त शिस्त, विद्यार्थ्याकडे दिलेजाणारे वैयक्तिक लक्ष, वसतिगृहातील शिस्त, रात्र अभ्यासिका, संशोधनाचे वातावरण, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या सर्व सोयी-सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
संगणकीकृत ग्रंथालय, वाचनालय, अद्ययावत प्रयोग शाळा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसोबत सामंजस्य करार, इनडोअर आणि आऊटडोअर क्रीडा साहित्य सुविधासहित खेळाची विस्तीर्ण मैदाने, अद्ययावत जिम, इंटरनेट आणिइंट्रानेट  सुविधा, सुसज्ज इमारती, नजरेत भरणारी स्वच्छता, वेगवेगळ्या प्रजातींची प्रचंड वृक्षसंपदा इ. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे हे महाविद्यालय विद्यार्थ्यांची पहिली पसंती  असते.  त्याचा परिणाम म्हणजे दरवर्षी महाविद्यालयात १००टक्के प्रवेश होतात.


वाचन संस्कृती वाढावी तसेच तिचे योग्य रीतीने संवर्धन व्हावे यासाठी ग्रंथसंचय तसेच ग्रंथ प्रदर्शन या माध्यमातून संत श्री गुलाबराव महाराज ग्रंथालयात पुस्तके, मासिके, नियतकालिके, अभ्यासोपयोगी जर्नल्स तसेच उच्च तंत्रज्ञानावर आधारितऑडीओ-व्हिज्युअल कॅसेटस् व सीडीज् च्या  माध्यमातून ही माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. ऐंशी हजारहून  अधिक पुस्तके, शेकडो संदर्भ साहित्य, विविध शैक्षणिक विषयांना वाहिलेली अभ्यासपूर्ण मासिके यांनी परिपूर्ण असलेल्या याग्रंथालयाद्वारे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वाचन साहित्यासोबतच हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविणारे अभ्यासपूर्ण व संस्कारक्षम धार्मिक ग्रंथही उपलब्ध केले जातात. या ग्रंथालयात बहुमजली दालन असून एकाच वेळेस ५०० हून अधिक विद्यार्थीं त्याचा लाभघेऊ शकतात. इंटरनेट सेवा, बुक बँक सेवा, डिजिटल लायब्ररी सेवा सुद्धा उपलब्ध आहे.
 श्रीं‘च्या प्रेरणेने साकारलेल्या या अभियांत्रिकी महाविद्यालयास उच्च दर्जाची सांस्कृतिक व धार्मिक बैठक लाभली आहे. हे शैक्षणिक संकुल ‘साक्षात सरस्वतीदेवीचे मंदिर‘ आहे असे अत्युच्च ध्येय समोर ठेवून उभारण्यात आलेल्या यामहाविद्यालयाच्या आवारातील सर्व इमारतींना संतसत्पुरुषांची नावे देण्यात आली आहेत. भारतातील आध्यात्मिक श्रेष्ठता दर्शविणाऱ्या विविध संतांचे पुतळे येथे आपणांस पाहावयास मिळतात. या शैक्षणिक संकुलात संत ज्ञानेश्वर वसतिगृह, संत कबिरव संत गुरूनानक वसतिगृह, स्वामी विवेकानंद वसतिगृह, आद्य शंकराचार्य वसतिगृह ही मुलांची वसतिगृहे आणि संत मुक्ताबाई, संत जनाबाई  व संत मीराबाई ही मुलींची वसतिगृहे उभारली आहेत. ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी वसतिगृहात राहतात. सर्व वसतिगृहांमध्ये वाय-फाय, प्रार्थना कक्ष, मेस सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयास भलामोठा कॅम्पस लाभला असून सर्वत्र हिरवळ आहे. परिसरात कॅन्टीन, पार्किंग, स्वयंचलित वीज यंत्रणा, दवाखाना, ए. टी. एम., अतिथी गृह, 1200 आसन क्षमतेच अद्ययावत सभागृह, 250 आसन क्षमतेचा हाय टेक सेमिनार हॉल, झेरॉक्स, स्टाफ क्वॉर्टर्स, सोलर प्रोजेक्ट, नर्सरी व प्लॅन्टेशन युनिट अशा विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. हया व्यतिरिक्त शैक्षणिक चर्चासत्रे, रक्तदान शिबिर, योगा शिबिर, व्यक्तिमत्व विकास शिबिर,ध्यानधारणा वर्गांमार्फत विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाला वाव दिला जातो. अध्यात्म आणि विज्ञान याची योग्यरीतीने सांगड घालून मानवी मूल्ये जपली जात आहे. 1983 पासून सुरू झालेला महाविद्यालयाचा प्रवास म्हणजे उत्कृष्ट व्यवस्थापनाचा परिपाक. महाविद्यालयचं व्यवस्थापन सर्वत्र नावाजल गेलय.   “सर्वे भवंतू सुखिना” हे ब्रीदवाक्य समोर ठेऊन महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे.
सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय
शेगाव