Friday, March 10, 2017

पुणे विद्यापीठातील आठवणी-भाग १३

       विद्यापीठ, विद्यार्थी आणि विरोधाभास...
पुणे विद्यापीठ आणि आंदोलनं हे काही नवीन नाही. विद्यापीठात अनेक विद्यार्थी संघटना आहेत. डाव्या-उजव्या विचारसरणीच्या संघटना आपपल्या परीने कार्यरत आहेत. अनेक आंदोलनं झालीत आणि होत राहतात. मी साधारण पाच-सहा वर्ष विद्यापीठात होतो. त्याकाळातील काही आंदोलनं लक्षात आहेत. २००६ मध्ये आम्ही तिथे गेल्यानंतर नवीन कुलगुरू रुजू झाले होते. ते खूप काही सुधारणा घडवतील अशी सर्वांची अपेक्षा होती. किमान त्यांच्या बोलण्यातून ते नेहमी जाणवायचं. कुठलीही गोष्ट असली कि डन...पुढील तीन वर्षे आम्ही हे डन ऐकत राहिलो. आणि डन म्हणजे फन आणि फन म्हणजे नन हे कसं झालं कळाल नाही. ओक्षफोर्ड ऑफ द इस्ट असं कायतरी काय तरी म्हटलं जात विद्यापीठाला.  
वसतिगृहाच्या समस्या ह्या कायमच्याच. आम्ही विद्यापीठात गेल्यानंतर जे पहिलं आंदोलन पाहिलं ते या संदर्भात. त्यावेळी मी ३ नंबरच्या होस्टेल ला राहायचो. रात्री भरपूर विद्यार्थी एकत्र येऊन घोषणाबाजी सुरु झाली. आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी कुलगुरूंच्या निवास स्थानाकडे निघाले. त्यामुळे सगळीकडे धांदल उडाली. सेक्युरिटी गार्ड, काही अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण विद्यार्थी काही मागे हटले नाहीत. आमच्या समस्या सुटल्या पाहिजेत असं त्याचं म्हणणं. विद्यार्थ्यांनी पत्रकारांना हि बोलावलं होतंच. काही वेळानंतर मोर्चा कुलगुरू निवास स्थानाजवळ पोचला. घोषणाबाजी सुरु होतीच.  आणि थोड्याच वेळात पोलीस येऊन पोचलेत. त्यांना पाहून अर्धे विद्यार्थी मात्र गायब झालेत. त्यांनी खूप विनंती करून हि विद्यार्थी काही ऐकेनात. सकाळी ३-४ वाजेपर्यंत आम्ही ४०-५० विद्यार्थी उरलो होतो फक्त. याचा परिणाम असं कि दुसर्या दिवशी कुलगुरू विद्यार्थ्यांसमोर हजर झाले. भरपूर आश्वासने दिलीत आणि निघून गेलेत. खरं तर सुधारणा झाल्या त्या नंतर काही प्रमाणात.
एम.फिल चे विद्यावेतन चा प्रश्न. २००८ ची गोष्ट. विद्यापीठाने नियम बदलून फक्त २-४ विद्यार्थ्यांना द्यायचं असं ठरवलं. यापूर्वी ते प्रत्येकाला मिळायचे. तिथूनच संघर्ष सुरु झाला. विनंती अर्ज, प्रशासनातील अधिकार्यांना भेटून वगैरे झालं पण तोडगा काही निघाला नाही. शेवटी त्यावर्षी  एम.फिल  ला प्रवेश घेणारे सगळे विद्यार्थी एकत्र येऊन आंदोलनाची रूपरेषा तयार झाली. साखळी उपोषण कि आमरण उपोषण यावर भरपूर चर्चा झाल्या आणि कुलगुरू बंगल्यासमोर उपोषण सुरु झाले. सुरुवातीला कुणी त्याची दखल घेतली नाही.  पण जेव्हा एक-दोन विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली तेव्हा विद्यापीठाला जाग आली आणि सर्वाना विद्यावेतन देण्याचा निर्णय झाला. पूर्वी १५०० रु. मिळणारं विद्यावेतन ३००० रु. झालं होत. विद्यार्थी खरच संशोधन करतात कि नाही हा भाग सोडून देऊ. पण विद्यावेतन हा कित्येक विद्यार्थ्यांचा आधार. त्याशिवाय पुण्यात जगणं कठीण.
खानावळ मधील अन्नाच्या दर्ज्याबाबत कित्येक आंदोलने झालीत. पण दर्जा काही सुधारला नाही. त्यावेळेस विद्यापिठाच समर्थ भारत अभियान जोरात होतं. इथं विद्यापीठ समर्थ होऊ शकलं नाही आणि म्हणे समर्थ भारत. समर्थ भारत एवढा पैसा जर विद्यापीठात सुविधा देण्यासाठी खर्च केला असता तर कित्येक प्रश्न सुटले असते. ५-७ वसतिगृह उभी राहिली असती आणि विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था झाली असती. पण प्रसिद्धी ची हाव लागली कि ते काही सुचत नाही. रोज पेपर मध्ये फोटो यायला पाहिजे ना. पुढे समर्थ भारत चं काय झालं माहित नाही. या प्रक्रियेत कोण-कसं समर्थ झालं हे उघड गुपित आहे.
कॅण्टीन बाबतीत हि तेच. विद्यापीठ दर ठरवून देते. पण ते दर कोणते हे विद्यार्थ्यांना माहीतच नसते. कॅण्टीन चालवणारे जास्त पैसे घेऊन आपला गल्ला भरत राहतात. जेव्हा जेव्हा हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं तेव्हा तेव्हा विद्यार्थ्यांनी आंदोलने केलीच. त्यामध्ये कधी कॅण्टीन मध्ये जाऊन तोडफोड वगैरे नित्याचंच. प्रत्येक गोष्टीला वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळेल याची काळजी घेतली जाते.
जयकर च्या रीडिंग हॉल मध्ये बाहेरचेच विद्यार्थी जास्त. त्यामुळे अधिकृत –अनधिकृत हा वाद नेहमीचाच. बाहेरचे विद्यार्थी आल्याने विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अभ्यासाला जागा मिळत नाही. त्यामुळे कित्येक वेळा भांडण हि झालीत किंवा होतात. सकाळी येऊन पुस्तके ठेवायची आणि जागा बळकवायची. कधी कधी एकदा पुस्तके ठेवली दिवसभर तिकडे न फिराकनार्यांची संख्या हि काही कमी नाही.
पण सगळीच आंदोलनं योग्य असतात असंही नाही. त्यातील एक म्हणजे कमवा आणि शिका संदर्भात  विद्यार्थी कल्याण मंडळ चे  संचालक यांच्या विरुद्ध काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेलं आंदोलन. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक चांगली वागणूक देत नाहीत वगैरे वगैरे आरोप होते. खरं तर कमवा शिका चांगल्या पद्धतीने राबवण्याच श्रेय त्यांनाच जाते. पण काम न करता पैसा याची काही विद्यार्थ्यांना सवय. तीच मोडीत निघाल्याने असंतोष तर असणारच. विशिष्ट विभागाचे विद्यार्थी स्वतःला विचारवंत समजतात. आपण जे करतो ते योग्यच. त्यांना साथ मिळाली ती तथाकथित पत्रकारांची. एक वर्षाचा डिप्लोमा केला कि पत्रकार. त्यांनी प्रसिद्धी दिली या आंदोलनाला. विजय विद्यार्थ्यांचा झाला. शेवटी विद्यापीठान त्यांच्याकडून कमवा आणि शिका काढून घेऊन दुसर्यांकडे सोपवली. एका चांगल्या व्यक्तीला खलनायक बनवल्या गेलं.
विरोधाभास आहेच. मुळात विद्यार्थी आंदोलनं का करतात हे कुणीच लक्षात घेत नाही. प्रशासन ने जर प्रश्न सोडवले तर आंदोलनाची गरज तरी काय? कदाचित त्यानाही त्याची सवय झालीय. प्रशासनात सगळं काही ठीक आहे असंही नाही. त्यांचाही साटलोट असतंच कि. नाहीतर विद्यापीठाने ठरवून दिल्लेल दर आणि कॅण्टीन मालक आकारणारे दर यात फरक का? वर्षानुवर्षे एकाच कंत्राटदाराला च कसं काय कंत्राट मिळतो. शंकेला वाव आहेच. कोण किती कमिशन घेतो कुणास ठाऊक. पण हे अविरत सुरु आहे. कुणालाच याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
मते मतांतरे असू शकतात. नुसती मोठ्या लोकांचे संदर्भ देऊन चालत नाहीत. एखादा विचारवंत समजायला आयुष्य निघून जाते. पण इथं विद्यापीठात आलं कि आपल्याला सर्व ज्ञात असा आविर्भाव आणणारे काही कमी नाहीत. स्वतबद्दल जरा जास्तच गैरसमज करून घेतला कि खरं काय कळत नाही. समाजवाद वगैरे च्या गोष्टी करणारे जेव्हा बाहेर नोकरी करून विद्यापीठात फुकटात राहतात, एम.फिल, पीएचडी चे विद्यावेतन घेतात तेव्हा खरं त्यांचीही कीव येते.
विद्यार्थी हा कुठल्याही शिक्षण प्रणाली मधील केंद्रबिंदू. त्याच्यावरच त्या त्या शिक्षणप्रणाली चे –यश-अपयश अवलंबून असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची सामाजिक जडण-घडण व्हायला हवी. ज्ञानार्जन पलीकडे त्यांना जाता यायला हवं. अनावश्यक गोष्टी त्यांच्यावर थोपवल्या जाऊ नयेत याची काळजी घ्यायलाच हवी.
जिकडे पाहावं तिकडे विरोधाभास...
(*मते वैयक्तिक आहेत.)

सचिन भगत


Wednesday, March 1, 2017

Review of One Indian Girl by Chetan Bhagat

The latest novel of the well-known bestseller writer Chetan Bhagat attracts the attention of the readers. The title makes us curious of what would be there.
You can predict what would be in 272 pages of a book if you have read his earlier fiction.  You will find everything that you always look for while reading his fiction.
The Story begins with the wedding scene of Radhika, the protagonist. She is a successful investment banker who is frank, independent and not a virgin. Goa Marriott is the hotel where both families are planned to stay.
The One Indian Girl, he is talking about, is no longer INDIAN at all. In no case she could match with the ACTUAL INDIAN GIRL (In our mind)-MAY BE A STEREOTYPE of INDAIN GIRL.
The so-called Indian Girl in his fiction, Radhika, is shown as the direct opposite of the actual Indian Girl. She belongs to the elite class and is no longer Indian by mindset. She is bold. She has gone through everything before her marriage. She confesses it with her would be husband who finds no problem in it and considers it as a matter of past. It seems very trivial when her ex-boyfriends come to meet her when marriage functions are going on.  It is also filmy when she calls her ex boy-friends Neel, Debu, and Brijesh (Would be husband) to meet her at the same time and the drama that happens.
The portrayal of Radhika as a feminist is one sided. It doesn’t fulfill the demand that the term FEMINIST is asking for. Is it like having affairs before marriage? Is it that independence only? Feminism is beyond that where we could listen and respect the INNER VOICE of a woman. Unfortunately, Chetan Bhagat doesn’t highlight it a lot. Had it done, it could have been a good piece of literature (worth readable). It is sad that popular culture still needs a woman’s body to make business.
Why to Read:
·         Read if you are interested to know whether they get marry or not.
·         To know what she does with her boy boyfriends. (Expected before we read)
·         To satisfy the unfulfilled desires only by reading.
·         To waste time if you have lots of time.
·         NO SPECIFIC REASON
Why not to read:
·         There is nothing that you will get from it except how to make love with girlfriend-around 7-10 pages (in between) of description at different places across the countries.
·         Save your time and utilize it for some other priorities.
·         It is not an entertainment at all. It is a waste of time.


Sachin Bhagat

पुणे विद्यापीठातील आठवणी-भाग १२

एलीस गार्डन
पुणे विद्यापीठाचा परिसर खूप विस्तीर्ण आहे. पुणे विद्यापीठाचा परिसर हा शैक्षणिक ओळख, इतिहास यांबरोबरच ओळखले जातो तो या आवारातील वृक्षसंपदेसाठी आणि तेथील जैव विविधतेसाठी. देशी आणि परदेशी वृक्ष हि या परिसरात आढळतात. जवळपास ४११ एकर चा हा परिसर. विद्यापीठात गेल्यावर विद्यापिठाच खरं सौंदर्य कळत. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा आपले लक्ष्य वेधून घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती एक लंब वर्तुळाकार जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. विद्यापीठात गेल्यानंतर कित्येक संध्याकाळी मी त्या पुतळ्याजवळ एकटा बसून असायचो. एविनिंग वाक ला जॉगिंग ट्रॅक वर खूप लोकं असतात त्या वेळी. या पलीकडे तिथे कपल्स हि मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसतात. काही दिवसानंतर हि काही आपली बसण्याची जागा होऊ शकत नाही असं समजलं आणि थेट जयकर चा रस्ता पकडू लागलो. संध्याकाळ च्या वेळेस एकही कपल जयकर मध्ये दिसत नाही. दिवसभर अभ्यास करून थकतात बिचारे आणि संध्याकाळी फिरायला जातात. विद्यापीठात भरपूर कपल पौइंट आहेत जसं कि मेन बिल्डींग चा मागील भाग, ओपन कॅण्टीन, एलीस गार्डन आणि असे कित्येक.
एलीस गार्डन बद्दल फार काही माहित नव्हतं सुरुवातीला. ब्रिटिश काळात विकसित झालेल्या गार्डन पैकी हे एक. विद्यापीठात गेल्यानंतर ब्रिटीशकालीन इमारतीच्या रचना आपल्या दृष्टीक्षेपात येतात. ओल्ड कॅण्टीन च्या समोर एक गेट तर सेवक चाळ आणि लेडीज होस्टेल च्या बाजूने दुसरं गेट.  त्याला एलीस हे नाव कसं पडलं याची नक्की माहिती नाही परंतु एलीस नावाची एक परदेशी महिला रहस्यमयरीत्या संदिग्ध अवस्थेत मृत आढळली होती आणि तिच्या नावावरून एलीस हे नाव असावं कदाचित.
कधी कधी मी आणि माझा मित्र तिकडे फेरफटका मारत असू. गार्डन मध्ये खूप जुनी आणि वेगवेगळ्या जातीची अशी विस्तीर्ण झाडे आहेत. सगळीकडे हिरवळ. अतिशय शांत आणि गार वातावरण. नैसर्गिक सौंदर्याने बहरलेलं ते गार्डन. तिथे फिरत असताना तो पाना-फुलांचा नैसर्गिक सुगंध अनुभवयास येतो. दिवसभर कित्येक जन तिथे बसलेले असतात. कुणाकडे पुस्तके , कुणाचं वाचन सुरु आणि बरंच काही. तर काही निद्रिस्त. मध्यभागी तालावासारखं आहे. तिथे पाणी साठलेलं असते. ठिकठिकाणी बसण्यासाठी बेंचेस आहेत. बहुधा सगळे लोन वरच बसतात.
गार्डन मध्ये  एक गोल जॉगिंग ट्रॅक आहे. त्याला चक्कर मारलं म्हणजे पूर्ण एलीस गार्डन पाहण्याचा आनंद घेता येतो. झाडा-झुडुपांच्या आड ठिकठिकाणी कपल्स बसलेले दिसतात. ते विद्यापीठातील असतात असं काही नाही...बाहेरचे कित्येक येतात. बर्याच वेळा मी आणि माझा एक मित्र फिरत असताना आम्हाला आमच्या ओळखीचे कपल्स दिसायचे. ते कधी आपल्याकडे पाहत नाही. चुकून नजर एक झालीच तर चेहऱ्यावर हास्य खुलून दिसायचं.कित्येकांचं प्रेम इथेच बहरलं आहे. काही कायमचे बंधनात अडकले तर काहींची ताटातूट झाली किंवा त्यांनी केली. संध्याकाळी ६ नंतर मात्र तिथे जाण्यास परवानगी नसते. एखाद्या वेळी गाडीवरून बाहेरच्या रोडने जात असताना उठ रे, कोण आहे रे तिथं असं ओरडण्याचा बालिशपणा हि आम्ही बर्याचदा केलाय.  शेवटी आपण माणसचं ना. कितीही पुढारलो तरी येणार तिथंच.
नन्तर मात्र आम्ही तिकडे जाने बंद केलं. गेलोच तर तिथं फिरण्या ऐवजी लोन वर बसायचं. कित्येक विद्यार्थी तिथे अभ्यासाला जातात. पण किती अभ्यास होत असेल याबाबत शंकाच आहे. कारण आपलं लक्ष विचलित करण्याचा भरपूर गोष्टी तिथे असतात. नैसर्गिक सौंदर्याबरोबरच विविध गोष्टींसाठी ओळखले जाणारे हे गार्डन. पुणे हे फक्त विद्येच माहेरघर आहे असं नाही तर इतर अनेक गोष्टीचं आहे असं म्हणायला हरकत नाही. विद्यापीठात आलेला विद्यार्थी फक्त अभ्यास करतो असं नाही तर तो अनेक बाबतीत पुढे असतो. ज्याला जो मार्ग आवडतो तो त्या मार्गाने पुढे जातो. ज्ञानार्जनापलीकडचं जग हि आपल्याला खुणावत असतंच कि.
शेवटी “पुणे तिथे उणे काय” हे काय खोटं आहे व्हय.

                                                                   सचिन भगत