Tuesday, October 9, 2018

त्याची गोष्ट (उत्तरार्ध)


ऑल अनिमल्स आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल दन अदर्सत्याच्या डोक्यात हे वाक्य कायम फिरत राहत होतं. इक्वल म्हणजे इक्वल. आता हे मोअर इक्वल कुठून आलं. त्याला काही कळेना. वाचनात आलेलं किती सारं आठवत होतं. अटचमेंट इज द सोफ्ट पोइझन (Attachment is the soft poison). खरंच आहे ते. तिच्यात गुंतलो नसतो तर किती बर झालं असतं. There is always some madness in love. But there is also some reason in madness. यावर त्याच्या विश्वास बसला होता.
ऊन डोक्यावर आलं होतं. आजूबाजुच्या शेतामधले लोकं काम करत होती. त्याचं निरीक्षण कधी थांबल नाही. काय जीवन आहे या लोकांच. उन-वारा-पाऊस वगैरे काही पण असो काहीच फरक पडत नाही. धावत असतात सतत. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. त्याचं जीवनमान तो पाहत होता. वर्षानुवर्षे शेती करणारे अजूनही आहे तिथेच आहेत. त्यात काहीच फरक पडलेला नाही. त्यांच्याकडे पाहून त्याला हेवा वाटे. कितीही अडचणी आल्यात तरी त्यांचा प्रवास सुरु आहे. त्याच्या बाबतीत मात्र वेगळच घडलंय. कुठं थांबावं हे कळायला पाहिजे असं त्याला कित्येकदा वाटे.  पण तो अस्तित्ववाद त्याचा पाठलाग काही सोडेना. तो बेकेट नाही का काही तरीच बरळला...
Where I am, I don't know, I'll never know, in the silence you don't know, you must go on, I can't go on, I'll go on.
मनुष्याचं जीवन च निरर्थक आहे म्हणतात. It is meaningless. It is futile. It is absurd. वगैरे काहीतरी.
दिवसामागून दिवस जात राहिलेत. त्याची मानसिकता काही बदलेना. स्वतःच्या आयुष्यात तो गुरफटत गेला. दुनियेत काय चाललंय याचा मागमूस नाही.  विचारांची गर्दी झाली होती. तो सार्त्रा नाही का म्हटला-“I am. I am, I exist, I think, therefore I am; I am because I think, why do I think? I don't want to think any more, I am because I think that I don't want to be, I think that I . . . because . . . ugh!” तो स्वतःशीच पुटपुटत होता कित्येकदा.  तो ओमर खय्याम तर त्याला प्रचंड भावला. त्या रूबायत मधल्या ओळी आठवल्या की त्याला हायसं वाटे:
Oh threats of Hell and Hopes of Paradise!
One thing at least is certain - This Life flies;
One thing is certain and the rest is Lies -
The Flower that once has blown forever dies.”
त्या वर्षी पावसानं दांडी मारली ती मारलीच. उपजीविके पुरत ही निघालं नाही. दोन-तीन वर्षापासून पिक कर्ज ही थकलेलं. त्याची उमेदच गेली होती. त्याला कशातच रस नव्हता.  शेतकऱ्यांच जीवन जवळून पाहत होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलणारे ए.सी.त राहतात आणि ए.सी. गाडीत फिरतात. सार्या हवेतल्या गप्पा असतात. नेते मोठे झालेत आणि शेतकरी रसातळाला गेला. वृत्तपत्रांमधून विकासाच्या गप्पा, चर्चा व्हायच्या. प्रगती झालीय वगैरे. प्रत्यक्षात सगळं खरं नव्हतं.  नकळत तो तुलना करत होता.
कित्येकदा न राहवून तिचा विचार यायचाच. किती प्रयत्न केला असेल टाळण्याचा. पण शक्यच झालं नाही कधी. ती शेवटची घरी गेली तेव्हा हा शिवाजी नगरला तिला सोडवायला गेला होता. ती बस मध्ये बसून गेली. ती बस नजरेआड होईपर्यंत तो पाहत राहिला. त्याला जायचं होतं तिच्यासोबत तिच्या शहरापर्यंत. पण ती नाही म्हटली. वर्तमानातून-भूतकाळात फिरत होता.
काय करत असेल ती आता? ती खरंच सुखी आहे का? का तिच्या घरच्यांनी जबरदस्ती केली? त्या सार्त्रा चं वाक्य न कळत त्याच्या तोंडून निघे-  “You must be like me; you must suffer in rhythm.”
माय-बापाचा एकमेव आशेचा किरण तो. पण त्याचं काय झालं त्यांना कधी समजलं नाही. त्यांनी कधी विचारलं नाही. आपला पोरगा घरी तर आहे त्यातच त्याचं समाधान.
त्याचं गाव म्हणजे अतिशय छोटं खेड. एका कोपर्यात घडलेली घटना काही सेकंदात पूर्ण गावात. त्याच्याबद्दल असलेल्या चर्चा ही त्याला ऐकिवात होत्या. लोकांच्या नजरा त्याला सर्व काही सांगून जायच्या. रोल मॉडेल व्हायचं होतं पण उलट घडलं. कुणी आपुलकीने विचारे तर कुणी टर उडवण्यासाठी.  लोकांचं ते बोलणं, त्या नजरा..असह्य. तो अल्बर्ट खरंच सांगून गेलाय-“But in the end one needs more courage to live than to kill himself.”
या लेखकांच्या तत्त्वज्ञानाने तो पछाडला होता. वाचलेलं सारं काही आठवत होतं. ओठांवर येत होतं. स्वतःशीच तो बडबडत करत असे.

तो निझे नाही का काय म्हणत होता- One should die proudly when it is no longer possible to live proudly. किती छान बोललाय तो. कित्येक दिवस त्या  वाक्याने त्याचा पिच्छा पुरवला.  मानवी जीवनाचा नेमका अर्थ काय. कशासाठी जगतो आपण?  डू वुई लिव्ह टू सफर? सगळेच धावत असतात. कशासाठी? शेवट माहित असूनही हाव काही सुटत नाही. वेटिंग फॉर समथिंग? बट व्हाट इस समथिंग? नोबडी नोझ.
एके दिवशी तो शेतात गेला आणि परतलाच नाही. त्यानं आपलं जीवन संपवलं होतं. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा कळल तेव्हा चक्र फिरली. पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्याच्या खिश्यात एक चिट्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं..”मी लंडन ला चाललो आहे. वाट पाहू नका.” कुणालाच काही समजलं नाही. पोलीस दरबारी आकस्मिक गेल्याची नोंद झाली आणि फाईल बंद.
दुसर्या दिवशी “एका तरुण शेतकर्याची आत्महत्या” अशी बातमी वृत्तपत्रात झळकली. स्थानिक राजकीय नेते मंडळींनी तुटपुंजी मदत दिली. शासनाकडून काही नाही. घोषणा मात्र झाल्यात.
एक तरुण मुलगा गेल्याचं दु:ख ते कुटुंबच जाणो. नेमकं काय झालं. सगळे अनभिज्ञच. लोकांमध्ये कुजबुज मात्र सुरु राहिली. जो तो आपल्या परीने कथानक पसरवत राहिला. ज्याला काही माहित नाही तो पण सहभागी होत राहिला या चर्चेत. नको त्या गोष्टी चघळल्या गेल्या आणि भूतकाळ होऊन गेला.