Monday, September 30, 2019

मी अनुभवलेलं परिवर्तन (परिवर्तन अभिवाचन महोत्सव, जळगाव)


मी शनिवार ला जळगावला गेलो. मनोज नेहमी घ्यायला येतो. पण परिवर्तन चा कार्यक्रम असल्याने त्याला जमलं नाही. त्यानं सांगितल्याप्रमाणे मी रोटरी हॉल गाठला. अनेक लोक येतात या अभिवाचानाला. स्व-इच्छेने. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत. हळू-हळू हॉल भरत गेला. काही लोकांनी मनोगतं व्यक्त केली सुरुवातीला. अभिवाचन चा शेवटचा दिवस होता. साडे-सहा ला असलेला कार्यक्रम पाउणे-आठ च्या आसपास सुरु झाला. परिवर्तन चा कार्यक्रम तसा वेळेवर सुरु होत नाही. असं ऐकलं कुणाच्या तरी तोंडून. पण परिवर्तन ही प्रक्रिया आहे निरंतर चालणारी. ती ठरवलं म्हणजे होत नाही. परिवर्तन व्हायला वेळ लागतोच. त्यामुळे परिवर्तन हे साजेसं नाव. याबद्दल दुमत नसावं.
आतापर्यंत च्या आयुष्यात मी अभिवाचन कधी बघितलं नव्हतं. 
मला ती संधी मिळाली या निमित्ताने.
फेसबुक वर फक्त वाचनात आलेलं, मनोज ने सांगितलेलं प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.
खरं तर मि आलोय आणि मला हा अभिवाचन च्या कार्यक्रमाला घेऊन निघाला. पण मी काही बोललो नाही.  वयानुसार थोडा बदल माझ्या बाबतीत ही. त्याचं ही काही वेळापत्रक असते. म्हणून मी काही न बोलता हॉल मध्ये जाऊन बसलो होतो. त्याला माझ्या बद्दल थोडी शंका होतीच. हा बसेल की नाही म्हणून. एक-दोनदा त्याने मेसेज ही केला. बाहेर येऊ शकतोस, गाडी घेऊन जाऊ शकतोस वगैरे. पण तसं काही घडलं नाही.
अमृता प्रितम.. साहीर आणि इमरोज हा विषय होता.
विषय जवळचा होता.  कारण अमृता प्रितम आणि तिचं आयुष्य याबद्दल मला प्रचंड कुतूहल होतं, आहे. अमृतावर मी काही पुस्तके वाचली होती. किती वेळा गुगल सर्च केलं. मला नेहमी काहीतरी खटकत राहिलं. कधीच समाधान मिळालं नाही. काहीतरी राहून गेलंय असं वाटतं राहिलं. माझ्या मनात तिच्याबद्दल, साहीर बद्दल नेहमी कुतूहल होतं, उत्सुकता होती.
या अभिवाचनाच्या निमित्ताने अमृता प्रीतम... मला आज नव्याने कळली.. कारण मी तिला समजून घेताना साहिर आणि ती असा संबंध जोडता होतो. पण तसे नाही. तिचं बालपण, आजुबाजूच वातावरण, एक कवयित्री अश्या अनेक ओळखी मला झाल्या.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे इमरोज. जो मला कधीच समजला  नव्हता.
कार्यक्रम जसा जसा पुढे सरकत गेला तसं तसा एक एक गोष्ट उलगडत गेली.
ईमरोज कोण ते  कळलं. चित्रकार. पेंटर की त्या पेक्षा अधिक.
इमरोज सुटून गेला होता . त्याचं मोठे पण लक्षात नव्हतं आलं. तब्बल ४५  वर्षे हा माणूस अमृता सोबत राहिला. दुर्दैवाने त्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. या अभिवाचनातून परिवर्तन ने  इमरोज लोकांसमोर आणला, सादर केला हे महत्त्वाचे.
नेहमी इंग्रजी मधून वाचलेली अमृता आज मराठीतून कळाली.
अभिवचन एवढं सोपं नाही. त्यात अमृता. साहीर. इमरोज. जी नावं कित्येकांना माहित नाही. नावं माहित असलीच तर त्याचं योगदान माहित नाही. परिवर्तन ने ते आव्हान समर्थपणे पेललंय.
मनाला भिडणारे संवाद, आवाज, देहबोली, अधून-मधून येणारं संगीत मस्तच. उत्कृष्ट कलाकार आहेत. चांगल्या लोकांचा गोतावळा आहे. उत्कृष्ट सादरीकरण. 
माणूस सहवासानं घडतो. ज्यांना हा सहवास ती नशीबवान लोकं. अत्यंत धकाधकीच्या आयुष्यात परिवर्तन च हे काम उल्लेखनीय.
मला कलाकारांची नाव माहीत नाही. त्याबद्दल क्षमस्व. ते शंभू अण्णा आणि हर्षल सर मात्र लक्षात राहिले.
गांधी नाकारायचा...हे शंभू अण्णा/पाटील यांची कलाकृती पाहण्याचा योग आला नाही. गांधी सादर करणं तसं कठीणच. पण त्यांनी गांधी अतिशय वेगळ्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने सादर केला असं ऐकलं. कार्यक्रम झाल्यावर परिवर्तन बद्दल थोडी माहिती जाणून घेतली.
२०१५ ला परिवर्तन ची सुरुवात झाली. वाचन संस्कृती वाढवणे, जोपासणे हा एक उद्देश. म्हणून पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन पुस्तकं देऊन सत्कार करतात. पुस्तकांची देवाण-घेवाण. छान च. वाचनाचं वेड कमी होत असताना, वाचन संस्कृती लयास जात असताना हे प्रयत्न वाखाणण्याजोगे. परिवर्तन ला एक चळवळ म्हटलं तर हरकत नाही.  या पेक्षा चांगली चळवळ होऊ शकत नाही.

अनेक महोत्सव / कार्यक्रम आयोजित केले जातात परिवर्तन तर्फे. वाचन प्रेरणा दिन, धुळे महोत्सव असे अनेक.
अनेक लोकं आहेत परिवर्तन मध्ये. कुठल्याही संस्थेच आर्थिक पाठबळ नसताना हे सुरुय. समाज प्रबोधन. परिवर्तन ही एक चळवळ आहे. जीवनाचा महोत्सव आहे. परिवर्तन फक्त जळगाव पुरती मर्यादित न राहता सर्वत्र ती पोचावी ही आशा आणि ती पोचेल ही खात्री. हल्ली ऐकण्याची क्षमता कमी झालीय. पण मी तिथे च बसुन राहिलो. हे या महोत्सवाच/अभिवाचनाच महत्त्व.
या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.
Thank you परिवर्तन.

सचिन भगत   (९९२२१२७३८५)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव