Monday, November 25, 2019

नैतिकता हरवत चाललेली पत्रकारिता (Journalism)


मी शिकत असताना पत्रकारीते बद्दल प्रचंड आकर्षण होतं. या आकर्षणापायी मी २०११-१२ ला रानडे ला प्रवेश घेतला. एक वर्षाचा डिप्लोमा. नेमकी पत्रकारिता काय हे जाणून घ्यायचं होतं. मला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी त्या वर्षभरात कळल्या. बातमी म्हणजे काय? ती कशी लिहावी...पहिल्या उतार्यात काय असलं पाहिजे...संशोधन.... Truth & accuracy, Impartiality, Independence....फिचर (Feature), कोलम (Column) सारख्या संकल्पना ... प्रिंटींग ते सर्क्युलेशन पर्यंत चा प्रवास वगैरे अनेक गोष्टी.
त्यातलं एक  Yello Journalism....खरं तर आजकाल हेच सुरुय. कुठलंही संशोधन नाही. मनोकल्पित बातम्या सर्रास दाखवल्या जात आहेत. खरं-खोटं ची खातरजमा नाही.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने पत्रकारदिन साजरा करणार्‍या किती जणांना जांभेकर समजले हा कळीचा मुद्दा.
आपल्या लेखणीतून सत्ताधार्यांना घाम फोडणारे पत्रकार पाहिलेय.  अनेक नावाजलेले पत्रकार (Journalists) या देशाने पाहिलेय. प्रल्हाद केशव अत्रे पासून अनेक.

आज मात्र पत्रकारिता हा उद्योग (Business) झालाय.  मोठं-मोठे वर्तमान पत्र, चॅनेल कुणाच्या मालकीचे आहेत हे पाहिल्यावर लक्षात येईल. ते कुणाचा अजेंडा चालवतात वगैरे ते ही कळेल.
आपण भोळी-भाबडी मानसं जे वाचतो, पाहतो त्यावर विश्वास ठेवतो. आपल्या कधी कळत नाही की त्या मालकांना जे दाखवायचे आहे ते दाखवतात. कुठली बातमी दाखवायची, कुठली नाही हे सारं ते ठरवतात. खरं-की खोटं या भानगडीत आपण पडत नाही. वाचलेलं , पाहिलेलं खरं असेलच याची आता शाश्वती राहिली  नाही.
अलीकडचे पत्रकार पहिले की त्यांची कीव येतेय. कुठला अभ्यास नाही, संशोधन नाही. माईक हातात धरला की तत..मम करून वेळ मारून न्यायचा प्रकार सुरु झालाय. त्यात भर पडली ती सोशल नेट्वर्किंग ची. नेमकं खरं काय हे कधीच समजत नाही. आताची सगळ्यात मोठी बातमी...आणि बातमी काय ...अमुक-तमुक यांच्या भेटीला गेले, हॉटेल/घरा मधून बाहेर पडले.  बरं की घरात येऊ देत नाही तुम्हाला. अन्यथा तुम्ही तर आमके महाशय किती वेळ संडासात गेले? ते बाहेर पडल्यानंतर कसा वास येत आहे याची ही बातमी केली असती. अरे काहीतरी लाज बाळगा. पत्रकारिता काय ते तर समजून घ्या.
ज्ञानाच्या, अभ्यासाच्या नावानं बोंब आहे. चाटुगिरी आतातरी बंद करा. तो ABP चा एक महाशय तर असं काही बोलतो की त्याला सर्वज्ञात आहे. अरे तुझी लायकी सगळ्यांना ठाऊक आहे. इतकं पण चाटू नये की ज्यामुळे आपली ओळख चं नष्ट होईल.
कशाची बातमी करावी याचं काहीतरी तारतम्य असायला हवं. लोकांचे असंख्य प्रश्न असताना त्यांना वाचा फोडण्या ऐवजी त्या तैमुर न शी केली, सु केली याचं वार्तांकन. कुठे घसरलात रे गाढवानो. गाढव च.
पूर्वी चर्चेत नामवंत लोकं असायची. त्यांच्या चर्चा ऐकाव्या वाटायच्या. सध्या त्या चर्चेतली लोकं पाहिली की असं वाटतं त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना ही तो आश्चर्याचा धक्का बसत असेल हे महाशय एवढे ज्ञानी म्हणून.
आरडाओरडा केली म्हणजे आपण म्हणतो ते खरं होतं का कुठं? सत्य ते सत्य. मग ते तुम्ही कसंही सांगा ते बदलत नाही. असे आरडाओरडा करणाऱ्या पत्रकारांची कीव येते.  दलाल पत्रकार प्रचंड वाढले आहेत. भुरटे पत्रकार म्हणता येईल यांना.
लोकशाहीचा चौथा खांब (Fourth Pillar of Democracy) वगैरे बोलायच्या गोष्टी झाल्याय. हा खांब डळमळीत झालाय. पाकीट पुरवलं, त्यांना साजेसे निर्णय घेतले की आपला हेतू साध्य. हेच आज काल चे राजकारणी करताय. ब्रेकिंग न्यूज (Breaking News) सेन्सेशनल चं असली पाहिजे का? या बांडगूळ पत्रकांना आधी न्यूज (News) म्हणजे काय, नंतर ब्रेकिंग न्यूज चा अर्थ समजून सांगायला पाहिजे.
अलीकडचा शब्द म्हणजे सूत्र...नेमकं काय? सूत्राच्या नावाखाली आपल्याला हवं ते दाखवता येतं, खपवता येतं एवढंच.  सूत्र (Source) समजायचं असेल ना तर तुम्ही जसे जन्माला आलात ते सूत्र. तिथं logic आहे. त्या anchors बद्दल तर बोलायलाच नको. तोंड दिलंय म्हणून काहीपण बरळत सुटतात.
पत्रकारितेच्या मूळ तत्त्वांना हरताळ फासला गेलाय.  माध्यम स्वातंत्र्याच्या नावाखाली काय काय खपवलं जातंय.
आज किती माध्यम (Media) तटस्थ (Impartial) आहेत? जे काही आहेत त्यांचे काय हाल आहेत. यावरून माध्यम म्हणजे लोकांचा आवाज वगैरे किती झोल आहे हे लक्षात येईल. सत्ताधार्यांच्या मर्जीतले संपादक (Editors) सगळीकडे दिसून येतील. त्यामुळे तटस्थ वगैरे या फंदात आपण पडायलाच नको.

निवडणुकीच्या दरम्यान चे पोल आठवतात ना...२२० पार वगैरे.  मग कुठून रसद पुरवली गेली असणार हे उघड आहे. प्रत्यक्ष चित्र वेगळंच होतं. माझा आणि तुझा वाले हवेत उडत गेले. त्यांच्या त्या tagline आणि ते काय करतात याचा कुठलाही संबंध नाही.
त्यातल्या काही...
•“उघडा डोळे बघा निट”
•अचूक बातमी ठाम मत
•एक पाऊल पाऊल पुढे
•चला, जग जिंकूया
•सबसे तेज
•मजबूत इरादे, बढते कदम
•खबर...बनते भारत की
•खबर हर किमत पर
•सच जो आप जाणना चाहते है
•हकीकत जैसी खबर वैसी
•आपको रखे आगे
किती जण ते अमलांत आणतात हा संशोधनाचा विषय.
मेडिया वातावरण निर्मिती करत असतो. कुणाच्या तरी सांगण्यावरून perception तयार करत असतो. किती दिवस लोकांना मूर्ख बनवणार? लोकांनी ठरवलं तर लपण्यासाठी सुद्धा जागा उरणार नाही या भटक्या पिलावळ जमातीला.
आता सगळेच पत्रकार तसे झालेत असं नाही. बोटावर मोजण्या इतके नैतिकता बाळगून आहेत अजून. प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले तरी नैतिकता त्यांनी सोडली नाही. म्हणून अस्सल पत्रकारिता अजून जिवंत आहे.
टीव्ही सुरु करताना कुठलं न्यूज चॅनेल (News Channel) लावावं हाच मोठा प्रश्न आहे. कंटाळून मागच्या हप्त्यात काही न्यूज चॅनेल Deactivate केली free to air असली तरी.  
“Get the truth and print it.”
John S. Knight

आताच चित्र गंभीर आहे. ते कधी बदलेल माहित नाही. सत्ताधार्यांना प्रश्न विचारणारे, मंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे, त्यांना सळो की पळो करून सोडणारे पत्रकार, संपादक यांचा अस्त झाला. पुन्हा कधीतरी उदय होईल. सारं चित्र पालटेल.  या आशेवर थांबतो.

RIP Journalism…

सचिन भगत (9922127385)
श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय,
शेगाव