Wednesday, May 21, 2014

एका मित्राला पाठवलेले पत्र.....

पुणे सोडून पंढरपूर ला गेलो. जिथं कुणी ओळखीचं नव्हतं. सुदैवाने काही चांगले लोक भेटलेत. म्हणून पंढरपूर सोडल्यानंतर एका मित्राला पत्र पाठवलं. जग जरी तंत्रज्ञानाने बदलले असले तरी मला आवडतो तो पत्र व्यवहार. मनातल्या गोष्टी कागदावर उतरवण्यात जी मजा आहे ती बोलण्यात नाही. मी लिहिलेलं पत्र ते असं: (नावाचा उल्लेख मुद्दाम टाळला आहे)


नमस्कार,



कित्येक दिवसांपासून पत्र लिहिण्याचा विचार मनात घोळत होता. काल रात्री आपलं बोलणं झालं. सगळं डोक्यात होतंच फक्त शब्दात आणायचं होतं. मग काय रात्री तीन वाजेपर्यंत पत्र तयार. मध्यंतरी सरांना पत्र लिहून पाठवलं. दोन्ही गोष्टी भिन्न आहेत म्हणून हे स्वतंत्र पत्र. खरं तर कुणाला पत्र लिहाव असे लोक फार कमी असतात. सगळ्याच गोष्टी शब्दात व्यक्त होतात च असं हि नाही. तरी हि हा पत्र प्रपंच. तो पण मराठीत. पंढरपूर मध्ये सर अन तुम्ही सोडले तर कुणी जवळचं नव्हतंच. खूप गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात. का अन कशामुळे नाही कळल कधी. म्हणून सरांना अन तुम्हाला पत्र लिहावं वाटलं. तरी हि मनात जे आहे ते बाहेर येतच नाही. ती माझी कमजोरी म्हणा कि अजून काही. कुणास ठाऊक? 

जवळपास तीन-चार महिने आपण सोबत होतो. भरपूर गोष्टींवर चर्चा झाल्यात. काही नाती निर्माण कराव्या लागत नाहीत. ती होत जातात. नकळत. सर अन तुम्ही त्यातलेच एक. नकळत झालेली भेट हि पुढे कधी वाढत गेली ते कळलचं नाही कधी. ज्या दिवशी मी पंढरपूर सोडलं तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही. सरांना मी कॉलेज वर सोडलं, पण निघताना जी मनाची घालमेल झाली ती शब्दात नाही उतरवता येत. पूर्ण प्रवास याच विचारात गेला. नकळत सगळ्या गोष्टी मला आठवत गेल्या. ते दहा-बारा तास विचारचक्र सुरु होतं. सगळे चांगले वाईट अनुभव डोळ्यासमोर येऊन गेलेत. घरी पोहोचल्यानंतर कुठं ते बंद झालं. मला यायचं नव्हत. कॉलेज फार चांगल होत असं हि नव्हत. पण तुमच्या सगळ्यांमुळे पंढरपूर सोडायचं नव्हतं. काही गोष्टी आपल्या हातात नसतातच. We are puppets in the hands of God. What else? आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी मला हव्या होत्या त्या वेळेवर कधी मिळाल्या नाहीच. वेळ गेल्यानंतर ते सगळं माझ्याकडे येत गेलं. पण काय उपयोग. प्रत्येक गोष्टीला उशीर झाला. अजूनही तेच होतंय. तरी मी हार मानलेली नाही. त्यातच आनंद शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. एक निर्णय चुकला कि सगळं चुकत जात. माझ्या बाबतीत हि तेच झाल. माझा निर्णय पक्का होता म्हटलं तर तो बौद्धीक होता. पण मन मात्र मानायला तयार नव्हतच. ते मला नेहमी भूतकाळात घेऊन जात. तो प्रवास जड अंतकरणाने च झाला. भावनिक ऋणानुबंध. दुसरं काय. ते सहजासहजी होत नाहीच. 

कुणी आपलं म्हनाव असं शोधून मिळत नसतच कधी. तरी त्या बाबतीत मी नशीबवान म्हणायाल हवं. मी जिथं जिथं गेलो, तिथं तिथं मला आपली मानसं मिळालीच. तुमच्या सोबत घालवलेले ते क्षण कसे विसरू. पैसे नसताना खाल्लेली अंडा भुर्जी हि विसरता येणार नाही. पैसे असल्यानंतर शुभम. किती तो विरोधाभास. पण क्षण जगणं शिकलो. भूतकाळाचा गंध नाही अन भविष्याचा विचार नाही. तेच योग्य होतं. तुमचंते दिल-खुलास व्यक्तिमत्त्व नाहीच विसरता येणार कधी. क्षणार्धात आपलं स करून घेणारं, नाही विसरू शकत. मला पंढरपूर सोडायचं नव्हतच. पण ती वेळेची गरज होती. माझ्यासारख्या सामान्य व्यक्ती ला काही करता येत नव्हत. माझा निर्णय योग्य होताच. अन तो योग्य ठरला हि. सुदैवाने इथ सगळं आहे. पण तुमच्या सारखी मानसं नाहीत. पैसा तर कुठे हि मिळतो. माझ्यासाठी पैसा कमावणं कधी कठीन नव्हतचं. पण माणसाचं काय? ते काय पैश्याने मिळतात? नाहीच ना? बस तीच कमतरता आहे इथ. बाकी काहीच नाही. 

तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण लक्षात राहील. मग तो रायगड दौरा अन तिथलं शून्य नियोजन असो, कि ते तुमचं ते औरंगाबादच प्रकरण, “Why take risk” कि “why to take risk “ यावर ची चर्चा, वेळेवर चंद्रभागेकाठी सुचलेल्या कविता, अन बरंच काही अजून हि तसच टवटवीत आहे आणि राहीन. ऐश्वर्या हॉटेल वर सरांसोबत झालेल्या मैफिली तर अवर्नानियचं. ज्या गोष्टी मी सरांसोबत बोलू शकत नव्हतो ते तुमच्या सोबत शेअर केलं. कारण सरांचं व्यक्तिमत्त्व वेगळ आहे. त्या गोष्टी मी त्यांच्या सोबत बोलू शकत नव्हतोच.त्यात आपण खूप दिवस सोबत राहिलो. मला आलेल्या कित्येक अडचणी तुम्ही अन सरांनी दूर केल्यात. का केल्यात त्याचा मी विचार नाही करत. नाही तरी वेळेवर मदत करणारी लोकं मिळतात कुठ. तसा मी फार लहान आहे तरी तुम्ही फार जुळवून घेतलं. म्हणूच च तुम्हा दोघांचं महत्त्व माझ्या दृष्टीने फार मोठं आहे. ते नाही मला मला शब्दात सांगता येणार. 

तुमचं ते साहित्यिक बोलणं मला नेहमीच आवडलं. म्हटलं तर हेवा पण वाटला. कारण ते सहजासहजी येत नाहीच हे मी चांगल जाणून आहे. ती रूम जिथं आपण राहिलो ती कित्येक घटनांची साक्षीदार आहे आणि राहील. खूप चांगले वाईट अनुभव आलेत. पण त्या रूम मध्ये प्रवेश केल्यापासून सगळं बदलत गेलं. म्हणून त्या निर्जीव वस्तू बद्दल पण आत्मीयता आहे. सर, तुम्ही, अन ती रूम यापलीकडे पंढरपूर नाहीच. पंढरपूर माझ्यासाठी संपलं. सुरुवात अन शेवट एकच. मला रूम स्वच्छ ठेवणं कधी जमल नाही. तुम्ही ते फार आनंदाने केलंत. रूम ची अवस्था काय होत असे ते वेगळ सांगण्याची गरज नाहीच. तसं मला समजुन घेण फार कठीण आहे आणि होतं. पण का कुणास ठाऊक सर अन तुम्ही ते कस केलत. कित्येक वेळा रूमवर झालेल्या पार्ट्या हि नाही विसरता नाही येणार. माझं तसं कुणी नव्हतंच तिथं. सरांनी एक कुटुंब अन मित्र अश्या दोन्ही गोष्टी दिल्यात. त्यात च मला खूप आनंद आहे. आयुष्यात भरपूर लोक येतात अन जातात. पण बोटावर मोजण्या इतकीच लक्षात राहतात. 

अजूनही तुम्हा लोकांना खूप मिस करतो. सोबत पार्टी करण्यायोग्य लोक आढळत नाहीत. तसल्या गप्पा होत नाहीत. म्हटलं तर लोक रसिक नाहीत. जे आपण केलं ते मनापासून केलं. ३०,९०, १२०, सोबत धुराडा इतरांसोबत शक्य नाहीच. कित्येक रात्री अश्या आनंदात गेल्यात. आज त्या रात्रींची आठवण येते. ते क्षण नेहमी आठवतात. मी आलो ते फक्त वेळ जाऊ देण्यासाठी. माझी कुठली महत्त्वाकांक्षा नव्हतीच. त्यामुळे पंढरपूर ला थांबणं शक्यच नव्हत. पण इतक्या लवकर सोडेन असं डोक्यात नव्हतं. माझी काही स्वप्नेही नव्हती तिथ. पण एवढ्या कमी वेळात खूप शिकायला मिळालं. तुम्हा सगळ्या लोकांचा सहवास मिळाला. नकळत शिकत गेलो. आज तेच कामाला येतंय.
शेगाव ला आलो. सुदैवाने चांगल कॉलेज मिळालं. म्हटलं तर अजून एक जुगार यशस्वी ठरला. एक कॉलेज सोडून दुसरीकडे जाण्यात धोका असतोच. मी तो पत्करला. निर्णय योग्य ठरला. नशिबाची साथ म्हटलं तरी हरकत नाही. 

प्रत्येक क्षण आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करतोय. म्हटलं तर तेच आपल्या हातात आहे. पण पंढरपूर कायम लक्षात राहील. जेव्हा जेव्हा पंढरपूरचा विषय येईल तेव्हा तेव्हा तुम्हा लोकांचा चेहरा समोर येईल. बाकी ना पंढरपूर मध्ये काही लक्षात ठेवण्याजोग आहे ना त्या कॉलेज मध्ये. ते कॉलेज म्हणजे गेमाडपंथियांचा अन हाजी हाजी करणारयाचा भरणा. या व्यतिरिक्त काही लक्षात राहील असं काही नाहीचं. पण त्यामुळे आपली भेट झाली म्हणून ते महत्त्वाचं. अन्यथा काहीच नाही. वेळोवेळी आपण केलेलं सहकार्य नक्कीच लक्षात राहील. आभार मी मानणार नाही, कारण आभार परक्यांचे मानायचे असतात. 

आयुष्य हे वेगळच आहे. पुन्हा कधीतरी भेटू. “माणूस आशेवर जगतो, मग ती आशा कितीही निराधार असो, माणूस स्वप्नांवर जगतो मग ती स्वप्ने कितीही असंभाव्य असोत. “(ययाती ) मनुष्याचं जीवन म्हणजे एका आशेकडून दुसऱ्या आशेकडे चाललेला प्रवास. तेच आपण करतोय. 

पंढरपूर सोडून पंधरवाडा उलटून गेला पण तिथल्या आठवणी काही पाठ सोडेनात. कमी कालावधीत आपली झालेली मानसं 

… चंद्रभागेच वाळवंट … तिथे आमच्या मित्रांनी केलेल्या कविता अन आमचं ते उस्फुर्त प्रोत्साहन आणि दाद याचा तो संगम

… रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्ट्या रंगणाऱ्या गप्पा बाजूला रिकाम्या बाटल्यांची रांगखोलीत पसरलेला धूर अन 

त्याच्या साथीला जगजित सिंग यांच्या गजल्स ती वातावरण निर्मिती तर अप्रतिम … सगळीकडे अस्तवस्थ पडलेले कपडे 

… तरी सकाळी लवकर उठून उशीर होऊ नये म्हणून कॉलेज ला जाण्याची लगबग … त्यात आंघोळीला थंड पाणी … निस्तेज 
झालेलं डोकं लगेच ठिकाणावर यायचं … सुट्टी असली कि सोलापूर चे दौरे … त्यांची हि एक वेगळीच कथा म्हटलं स्वतंत्र 

पुस्तक लिहिता येईल त्यावर … माझे ते ५० १ मानसं sam नं काही सोडली नाहीत मध्येच मेडीटेशन च प्रकरण खूप 

हसवून गेल … पी एच डी करतोय म्हणून मोठ्या गप्पा करणं पण प्रत्यक्षात काम शुन्य एक वर्ष होऊन पण … दीड -दोन 

वर्ष कसे निघून गेलेत नाही कळले … पुन्हा कधीतरी भेटूयात अन त्या आठवणींना उजाळा देऊयात …. आयुष्य फार मोठ


 आहे 

खूप दिवसानंतर मराठी मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. खूप काही लिहायचं राहून गेलं. फक्त संदर्भ दिलेत. भावनांना शब्दात पकडण्याच कौशल्य माझाकडे नाही. तुमच्यासारखं बोलणं अन लिहिणं हि नाही जमणार. तरी हा एक प्रयत्न. त्यामुळे पत्रातील उणीवा आपण समजून घ्याल हा विश्वास. हि फक्त सुरुवात. हा पत्रप्रपंच असाच सुरु राहीन हि अपेक्षा.

धन्यवाद. 

आपला, 
सचिन भगत

No comments:

Post a Comment