Friday, January 19, 2018

पुणे विद्यापीठातील आठवणी भाग -१५

व्यक्तिविशेष: (उत्तरार्ध)
जेवढेही लोकं आपल्या आयुष्यात येतात त्या प्रत्येकाशी आपली मैत्री होऊ शकत नाही किंवा त्यांची आपल्याशी होऊ शकत नाही. एकमेकांना जवळ आणणारे काही धागे असतात त्यामध्ये सारख्या सवयी असतील, किंवा समान आचार-विचार किंवा अजून काही.  माझे विभागातील मित्र कमी आणि इतर विभागांचेच जास्त. माझा संपर्क सगळा माझ्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या सोबत. त्यामुळे कदाचित भरपूर गोष्टी शिकता आल्या. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलता आला. समवयीन मित्र फार कमी. कित्येक जण आहेत ज्यांच्यावर लिखाण होऊ शकते. त्यामध्ये राहुल राजपूत, तानाजी काळे, बालाजी सूर्यवंशी, सुनील कनकटे ई. चा समावेश होतो.
३ श्रीमंत जाधव:
काय लिहावं या माणसाबद्दल. पुण्यात फक्त नेट-सेट च्या अभ्यास करण्यासाठी आणि  निवास ते हि सांगवीत. रोज विद्यापीठात ये-जा. मुळ औरंगाबाद चे. कायम चष्मा आणि शर्टिंग. ग्रंथालयामध्ये आमची ओळख झाली. नवीन जयकर ला बसायचो तेव्हा आम्ही. संपर्क वाढत गेला तसा धागा जोडला गेला. त्यांच्यासोबत खूप क्षण घालवलेत. पत्रकारिता करत असताना सोबत जाने-येणे असायचे रानडे ला. पत्रकारितेला प्रवेश मिळाला तेव्हा प्रवेशाची फी पाच हजार रुपये नव्हते माझ्याकडे. खिश्यात काहीच नव्हते. शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी आम्ही दिवसभर अनिकेत कॅन्टीन ला बसून होतो. कित्येकांना तिथे बसूनच फोन केलेत. पण पैश्याची जुळवाजुळव काही होईना. सकाळी ८-९ वाजेपासून ते संध्याकाळी ५-६ वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो. त्यांनी कित्येक फोन केलेत माझ्यासाठी. समस्या माझी होती पण ती त्यांची समजून त्यांनी प्रयत्न केलेत. काय-काय उद्योग नाही केले या माणसाने. पण नेट पास व्हायचे या उद्देशाने झपाटलेला. यश लांबत गेलं पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. आता एका महाविद्यालयात रुजू झालाय. वैवाहिक जीवन सुरु झालंय. विद्यापीठात असतांना माझ्या चुकीच्या गोष्टींच हि समर्थन करणारा माणूस. माझ्यावर या माणसाचा प्रचंड विश्वास माझ्यावर. स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवलेला माणूस. पण हार मानली नाही. लढत राहिला. आणि शेवटी हवं ते मिळालं. आता कित्येक दिवस झाले संपर्क नाही. श्रीभाई चं स्थान आमच्या आयुष्यात खूप मोठ आहे. जयकर, अनिकेत कॅन्टीन, सेवक चाळ चा  नेहमीचा प्रवास कसा विसरणार. मला पंढरपूर एका महाविद्यालयात मुलाखतीला जायचं होतं. यांची सोबत होती. बाईकने पुणे ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पुणे असा प्रवास केला. माझ्यासाठी सर्व सोडून ते कुठेही यायला तत्पर. “साले तू मुझे नेट पास नही होणे देगा” असं बर्याच वेळा ते गमतीने म्हणायचे. माझ्याकडे बाईक होती तेव्हा भरपूर भटकंती केली आम्ही. ते सांगवीत असताना मी कित्येक वेळा रात्री त्याना भेटायला जात होतो.
४ ज्ञानेश्वर चोथवे:
मुळचे लातूर कडचे. माझे सिनिअर. एम.ए. करत असताना कधी संबंध आला नाही. संपर्क आला तो एम. फिल करत असताना. त्यावेळेस ५ नंबरच्या वसतिगृहात राहत होतो. नेमकी पहिली भेट आठवत नाही. पण सेवक चाळीत जाने हा एक समान धागा आणि त्या धाग्याने आम्हाला एकत्र आणले. एलीस गार्डन च्या बाजूला सेवक चालीकडे जाणार्या रस्त्याच्या कडेने कित्येक वेळ घालवलाय. तिथेच आमच्या चर्चा चालायच्या. प्लेन हार्तेड (Plain Hearted) माणूस हा. त्याच्या मनामध्ये दुसर्याविषयी कधीच राग, चीड वगैरे काहीच नाही. तसंही माझं फार लोकांशी जुळत नाही पण जुळल्यानंतर ते कायम राहत.
आम्ही एकाच विषयाचे. कित्येकदा विषयावर चर्चा व्हायची. मते-मतांतरे असायची. त्यांच्यामुळेच नामदेव पवार, सुनील कनकटे, शिवाजी मोटेगावकर यांच्याशी संपर्क आला. सोबत भटकंती झाली आणि आठवणी निर्माण झाल्यात. अनिकेत कॅन्टीन च्या बाजूला किती घालवला असेल कुणास ठाऊक.  कधी कधी संपर्क होतो. संवाद कमी असेल पण नातं कायम आहे. आता खारघर ला आहेत कुठल्यातरी अभियांत्रिकी महाविद्यालयात.
५. दीपक जाधव: सोलापूरचा. राज्याशास्रात एम. ए. करत होता. माझं लिखाण त्याच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कमवा आणि शिका चे एका ग्रुप चे सदस्य. झाडताना आम्ही नेहमी चर्चा करत असायचो. असा कुठलाच विषय नाही कि ज्यावर चर्चा नाही. सोबतीला तानाजी, राहुल होते. आम्ही आलो एकत्र आलो म्हणजे एकच प्रश्न किती पतंग उडवले. रोज त्यावर चर्चा. समवयीन असल्याने बंधन नव्हती. तानाजी आणि राहुल खूप चांगले व्यक्ती. प्रत्येकाचा एक वेगळा संघर्ष.
दिपक आणि मी खूप वर्ष सोबत होतो होस्टेल ला. काय लिहू त्याच्याबद्दल. सोलापूर ते पुणे येण्याचा संघर्ष लिहू कि पत्रीकारिता करीत असताना सायकल ने रानडे ला जाण्याबद्दल लिहू , का त्याच्या प्रेमाबद्दल लिहू. आता पत्रकार आहे एका वृत्तपत्रात. खरं सांगतो, आणि खरं मांडतो. म्हणून मी पण त्याच्याबद्दल तोच मार्ग अवलंबतो.
त्याच असं कि हा माणूस म्हणजे वेगळंच व्यक्तिमत्त्व. कॅन्टीन ला गेल्यानंतर टीटी एमएम मी याच्याकडून शिकलो पण त्याचा अवलंब फक्त त्याच्यासोबतच केला. रोज सकाळी उठला कि तो कुणाला तरी फोन करून गुड मोर्निंग म्हणायचा. मग आम्ही इतर सकाळी उठलो कि त्याच्या समोर एकमेकांना गुड मोर्निंग म्हणत होतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पहिले कि आमचा हास्यकल्लोळ. हा एकमेव ज्याच्या लग्नाला आम्ही शिर्डी ला गेलो होतो बाईकने. अवर्निनीय प्रवास होता. मुकेश, मिश्रा सर आणि अजून इतर सोबत होतेच. पत्रीकारिता करत असताना हि तो जयकर ला येत होता.  
तो रात्री जॉब करून आला कि डायरी लिहायचा. आमच्या ते ध्यानात आलं आणि मग काय कधी याची डायरी वाचायला मिळते याची उत्सुकता होती. आणि एके दिवशी ती संधी मिळालीच. त्याची डायरी तो त्याच्या बॉग मध्ये विसरला. मग सामुहिक वाचन झालं त्या लिखाणाच. खूप काही लिहिलं होतं त्याने त्यात. छान लिहिलं होतं. वैयक्तिक होतं पण भावलं.  हा अजून एक ज्यावर मी प्रचंड टीका करत होतो. पण त्याचं मोठेपण असं कि त्याने ते कधीच मनाला लाऊन घेतलं नाही. कधी कधी फोन येत असतो त्याच्या.  मोठा पत्रकार आहे आता. सेट ची परीक्षा हि पास झालाय. आणि हो प्रेमविवाह च आहे.  त्याच्याकडे गाडी आल्यानंतर तो खूप जपत होता तिला. सहजासहजी कुणाला देत नव्हता. त्यात अयोग्य हि काही नाही. गरिबीतून पुढे आल्यावर किमत असते कमावलेल्या प्रत्येक गोष्टीची. जॉब , ती , जयकर आणि आमच्यासोबत अधिवास असा तो विभागाला गेला होता.
माझ्यावर टीका करणाऱ्यांची संख्या विद्यापीठात काही कमी नव्हती. पण जी लोकं माझ्या आयुष्यात आलीत त्यांनी पूर्णपणे स्वीकारलं. माझा एका इंग्रजी वाक्यावर प्रंचड विश्वास-If you want to avoid criticism, Say Nothing, Do nothing and Be Nothing. But I did something and it invited criticism. अनेक शुभचिंतक भेटलेत.
बालाजी सूर्यवंशी, हिंदी विभागाचा विद्यार्थी, ला कसं विसरणार. गेट वर चा तो अंडा राईस आणि आपले विद्यापीठ ग्राउंड वरील प्रताप कसे विसरणार.  कित्येक दा आपण एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटलाय. हा माणूस म्हणजे कवी. विद्यार्थी दशेतच कविता संग्रह प्रकाशित. हाल-अपेष्टा आपल्या कवितेतून मांडणारा. भाई आपली ए गांधीजी ची कविता अफलातून. एलीस गार्डन मधली आपली झालेली नजरानजर मी विसरलो नाही अजून.  सुरुवातीला फार काही सख्य नव्हतं आमच्यात. पण सान्निध्यात आल्यानंतर स्वभाव कळलेत. आपण जे ऐकतो किंवा इतर जे सांगतात यावर विश्वास ठेवायचा नाही. आपण अनुभवायचं आणि ठरवायचं हि शिकवण विद्यापिठात मिळाली. त्यामुळेच कित्येकांच्या मनात असलेले समज-गैरसमज कालांतराने दूर झालेत. समान ध्येयान पछाडलेले आम्ही.  
या लोकांशिवाय विद्यापीठातील आयुष्याची कल्पना होऊ शकत नाही. आयुष्याला नवीन अर्थ प्राप्त झाला. कुणीच परिपूर्ण नाही. मी हि नाही. But the relations strengthen when you respect the differences. That is something most of us did. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात मग्न आहे. आता भलेही आनंदी आनंद आहे. पण भूतकाळातल्या दुखात –अडचणीत जी मजा होती, संघर्ष होता, तो काही औरच.  मुळात विद्यापीठात येणारे अनेक गरिबीची झळ पोचलेले असतात. त्या विद्यापीठात काय जादू आहे काय माहित. ते कधीच खाली परत पाठवत नाही. प्रत्येकजण काहीतरी सोबत घेऊन जातो. आठवणी तर विचारूच नका. कित्येक चांगले वाईट अनुभव इथेच मिळतात. विद्यापीठ म्हणजे एक खेडेगाव असं मी नेहमी म्हणत होतो. माझ्या संपर्कात आलेली कित्येक जण सक्रीय लोकं होते. काय नाही केलं. आंदोलनं तर नित्याचीच.
लिहिण्या आधी भरपूर गोष्टी डोक्यात होत्या. सगळं काही लिहिता आलं नाही. कोण कसं घेईल याचीही चिंता होती. सोशल नेटवर्किंग वर काय टाकावं आणि काय नाही याचे हि काय नियम असतात. त्याचं अनुकरण केलंय. म्हणून लेखाला व्यक्ती-चरित्र ऐवजी व्यक्तिविशेष असं म्हटलंय. बाकी आपण जाणकार आहातच. मी न लिहिलेल्या गोष्टी आपल्या डोक्यात आल्या म्हणजे लिखाण सफल झालं.  
भरपूर वर्ष गेलीत. या सार्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यावेळेस आम्ही स्पर्धक होतो. आता वेगळंच आयुष्य आहे. घडलेल्या घटनांबद्दल कुठलाही आकस नाही. किंबहुना आकर्षण आहे. आठवण आहे. मिस यु ऑल. मिस युवर कंपनी. मिस युवर को-ऑपरेशन. यु मेड माय लाइफ मोअर इंटरेस्टींग.


No comments:

Post a Comment